

Weather Department Forecast for Vidarbha and Central Maharashtra
Esakal
राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला असून अनेक भागात ढगाळ वातावरण दिसून येतंय. नाशिकसह कोकणात रत्नागिरीत काही भागात पावसाने हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाचा कडाकाही वाढल्यानं तापमानात मोठी वाढ झाली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत आहेत. वातावरणात होणाऱ्या अचानक बदलामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.