

महाराष्ट्रातील हवामानात अचानक मोठा बदल झाला आहे. उष्णतेच्या लाटेनंतर राज्यावर अवकाळी पावसाने, वादळी वाऱ्याने आणि गारपीटीने धुमाकूळ घातला आहे. मंगळवारीअनेक भागांत उष्णता, गारपीट आणि वादळी पावसाने तिहेरी संकट निर्माण केले. पुढील ४८ तास धोक्याचे असून आज बुधवार (१८ मार्च ) रोजीही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाने (IMD) राज्यातील २१ हून अधिक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.