

Maharashtra Weather Update news : राज्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून विदर्भात सूर्य आग ओकू लागला आहे. अकोल्यात सर्वाधिक ४४. २ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी विदर्भातील पाच जिल्ह्यांना उष्णेतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.