मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी 'चलो मुंबई'चा नारा देत २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्यातील मराठा बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.