Maratha Reservation : सरकारला किती अन् कशासाठी वेळ हवा? सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगेचा सवाल

आज मुंबईत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती.
Maratha Reservation Manoj Jarange
Maratha Reservation Manoj Jarange esakal

मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला ३२ जण उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे या मुद्द्यावर सर्वांचे एकमत झाले. तसेच मराठा आरक्षणासाठी आणखी वेळ द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वपक्षीय बैठकीनंतर, इतर समाजावर अन्याय न होता मराठ्यांना आरक्षण मिळावं असं आमचं याबाबत सर्वांचं एकमत झालं असून मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोग युध्द पातळीवर काम करत आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, मराठा समाजाने संयम राखावा, मनोज जरांगे यांनी सरकारला सहकार्य करावे ही सर्वपक्षीय नेत्यांची भावना असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीनंतर बोलताना म्हणाले.

याबद्दल विचारले असता मनोज जरांगे यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. जरांगे म्हणाले की, सरकारला किती आणि कशासाठी वेळ हवा आहे? तसेच सरसकट महाराष्ट्राला आरक्ष लगेच देणार का? समाजाला विचारून बघू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे.

Maratha Reservation Manoj Jarange
Maratha Reservation: सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं? बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्वाची माहिती

बैठकीत काय झालं याचा तपशील मिळाला नाही, गोरगरिबांच्या लेकरांकडे लक्ष न देता सरकार नुसत्या बैठका घेत आहे. मराठा समाजाच्या लेकरांचे विनाकारण मुडदे पडत आहेत, तरी लक्ष देत नाहीत. हसण्यावारी नेत आहेत. हे जनता सांभाळणारं सरकार म्हणायचं काय. गोरगरिबांच्या लेकरावर गुन्हे दाखल केले जात आहेत, असेही मनोज जरांगे म्हणाले.

Maratha Reservation Manoj Jarange
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? सर्वपक्षीय बैठकीत नेमकं झालं काय

तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्हाला वेळ कशासाठी पाहिजे आणि का पाहिजे? आणि महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार का? हे सांगा. तुम्हाला अर्धा तास द्यायचा की वेळचं द्यायचा नाही हे आम्ही मराठे विचार करून सांगतो. तुमच्या मनात काय आहे ते तरी कळू द्या, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com