

मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील भर ऊन्हात उपोषणाला बसले होते. हे उपोषण शनिवारी रात्री उशिरा स्थगित करण्यात आलं. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी सविस्तर चर्चेनंतर उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तसंच शिंदे समितीला एका वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणीही मान्य करण्यात आलीय. Manoj Jarange Ends Hunger Strike After Government Assurances