
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत संतप्त भाषण केले आहे. ते २९ ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन येणार आहेत. यावेळी शांततेत मुंबईत येण्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.