

CM Fadnavis On Jarange
Esakal
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १२वा दिवस असून ते अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. सरकारकडून शिष्टमंडळ चर्चेसाठी येणार नसल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावर जरांगे यांनी शिष्टमंडळ आलं नाही तरी चालेल, आम्ही १२ तारखेला मुंबईला जाणारच, असं ठणकावून सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजासंदर्भात चर्चा झालीय. सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यात आला असून काही शंका किंवा गॅप्स वाटत असतील तर त्या विचाराव्यात, त्या दूर केल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.