
नागपूरः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात रान पेटलेलं असताना छगन भुजबळ यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यांना मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं होतं. बीडमधील दंगल ही छगन भुजबळ यांनीच घडवून आणली होती, असा आरोप जरांगेंनी केला होता.
छगन भुजबळ यांनी बुधवारी सभागृहात बोलताना, मराठा समाजाला खुल्या प्रवर्गातून आणि ईडब्ल्यूएसमधून किती फायदा झाला, याचा पाढा वाचला. शिवाय अण्णासाहेब पाटील, सारथी या संस्थांच्या माध्यमातून मराठा समाजाने किती फायदा करुन घेतला याची माहिती दिली होती. ओबीसींवर अन्याय होतोय, त्यामुळे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध असल्याचा पुनरुल्लेख त्यांनी केला.
त्याला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी दंगली भुजबळांनी घडवल्या असं उत्तर दिलं होतं. शिवाय ते बावचळले असून कुणीकडेही बोलत आहेत असा आरोप केला. १७ तारखेला मराठा समाजाच्या धुरिणांची एक बैठक आंतरवाली सराटी इथं बोलावली असून पुढच्या लढ्याची दिशा ठरवली जाणार असल्याचंही जरांगे यांनी स्पष्ट केलं.
याच मुद्द्यावरुन गुरुवारी सकाळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोप-प्रत्यारोपांमध्ये महाराष्ट्राचं वाट्टोळं होऊ नये, सत्य शोधण्याचं काम सरकारचं आहे. दंगलींमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असं म्हणत त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगातील नवनियुक्त सदस्यांबद्दल भाष्य केलं. ''सरकारला मागासवर्ग आयोगामध्ये ओबीसी प्रतिनिधी नको होता'' असा थेट आरोप वडेट्टीवारांनी केला.
''सरकारला ओबीसी प्रतिनिधी मागासवर्ग आयोगात नको होता, त्यामुळे जुन्या प्रतिनिधींना काढण्याचं षड्यंत्र रचलं गेलं. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्याला आम्ही विरोध करणार नाही'' अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.