

Manoj Jarange Patil
esakal
मुंबई : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. येत्या १९ सप्टेंबरपासून मुंबईत बेमुदत उपोषणाला बसण्यावर ते ठाम असताना, राज्य सरकार मात्र सध्या ‘थांबा आणि पाहा’च्या भूमिकेत आहे. दरम्यान, आज झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत जरांगे यांच्या शिवराळ भाषेवर अनेक मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, अशा वातावरणात चर्चा कशी करायची, असा सवाल उपस्थित केला आहे.