

Latest Marathi News Live Update
esakal
ओडिशा मध्ये जनगणनेच्या कामात गुंतलेल्या दोन शालेय शिक्षकांचा दोन दिवसात भीषण उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर पुण्यातील शिक्षण संघटनांनी सुद्धा शिक्षकांच्या प्रति भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा अशैक्षणिक कामांचा मोठा डोंगर असल्यामुळे शिक्षक मानसिक तणावाखाली काम करत आहेत. प्रचंड उन्हामध्ये शिक्षकांना जनगणना याची काम देणं वगळले पाहिजे अशी मागणी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीचे समन्वयक शिवाजी खांडेकर यांनी केली आहे.