

Raigad Tourist Spot Ban
ESakal
पाली : पावसाळी हंगामात पुणे आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट या पर्यटन स्थळांवर सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. माणगाव उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे पर्यटक व व्यावसायिकांचा हिरमोड झाला आहे.