mahavitaran
sakal
मुंबई - थकीत वीजबिलामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या ‘महावितरण’चे विभाजन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने आता ४५ लाख कृषिपंपधारक ग्राहकांची स्वतंत्र ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पाॅवर लिमिटेड’ ही कंपनी अस्तित्वात येणार आहे. ‘महावितरण’चे प्रारंभिक समभाग विक्री करून निधी उभारण्याकरिता हे विभाजन करण्यात आले आहे. मात्र, ज्या ९० हजार कोटी रुपयांहून अधिक असलेल्या थकबाकीमुळे विभाजनाची वेळ आली त्या थकबाकीचे काय, त्याची वसुली कोण करणार, हे प्रश्न अनुत्तरितच असल्याचे चित्र आहे.