

Aditya Thackrey
esakal
चिपळूण: ‘गेली दहा वर्षे प्रत्येक गणेशोत्सवापूर्वी महामार्ग पूर्ण होणार, असे सांगितले जाते. मंत्री पाहणी करतात, अधिकारी येतात आणि त्यानंतर डागडुजी केली जाते; मात्र रस्त्याची परिस्थिती कायम तशीच राहते,’ असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी करीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणावरून राज्य सरकार आणि प्रशासनावर धारेवर धरले.