Mumbai-Goa Highway 97% Complete
esakal
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ चे काम आता अंतिम टप्प्यात आहे. उपलब्ध ताज्या अहवालानुसार, कशेडी ते झाराप या २८०.७१३ कि.मी. अंतरापैकी सुमारे २७२.३९७ कि.मी. म्हणजे जवळपास ९७ टक्के रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, रखडलेले उड्डाणपूल आणि काही तांत्रिक कामे मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.