

मुंबई : निवडणूक आचारसंहितेच्या काळात कापूस साठवणूक पिशव्या खरेदीच्या पिशव्या बाजार भावाच्या दुप्पट किमतीत कृषी विभागाने खरेदी केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. एकाच कुटुंबातील चार जणांच्या कंपन्यांना या खरेदीच्या निविदेचा लाभ मिळाल्याचाही आरोप करत पुन्हा एकदा तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी केली आहे.