
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच हा मुद्दा चांगला तापला असून नाना पटोले यांनी बबनराव लोणीकर यांनी माफी मागावी अशी मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असंसदीय शब्द वापरले, यामुळे त्यांचे विधिमंडळ कामकाजातून दिवसभरासाठी निलंबन करण्यात आले आहे.