मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray KCR Meeting) भेट घेतली. त्यांच्यामध्ये तब्बल साडेचार तास चर्चा झाली. केंद्रातील भाजप सरकारविरोधात विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्यासाठी ही बैठक होती, असं सांगितलं जातेय. त्यावरूनच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेसह उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले तर त्याचा समुद्र तयार होत नाही, असं राणे म्हणाले.
सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले तर त्याचा समुद्र तयार होत नाही. दाक्षिणात्य लोकांच्या विरोधात यापूर्वी शिवसेना ''हटाव लुंगी-बजाव पुंगी'' अशी घोषणा एक घोषणा देत होती. आता शिवसेना आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत, असं दाखवतात. अजब परिवर्तन आहे, अशी टीका नारायण राणेंनी केली.
तुम्ही तेलंगणा आणि आम्ही शिवसेना भाऊ-भाऊ, मिळेल ते मिळून खाऊ, अशी सध्या शिवसेनेची भूमिका असल्याचंही राणे म्हणाले. तसेच महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नाही आणि तेलंगणा म्हणजे भारतही नाही. भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार आहे व भाजपचे ३०१ खासदार आहेत, असंही राणे म्हणाले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चांगले संबंध होते. मात्र, अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून ते सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. तसेच सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन केंद्रातील भाजप सरकारविरोधात तिसरी आघाडी उभी करणार आहे, असं बोललं जातंय. त्यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर केसीआर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये तब्बल साडेचार तास चर्चा झाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.