Sindhudurg : 3 पक्ष एकत्र असताना पराभूत झाले, याला अक्कल म्हणतात

महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री नाही, राज्याची वाटचाल अधोगतीकडे ; नारायण राणे
Ajit Pawar, Narau=yan Rane
Ajit Pawar, Narau=yan RaneEsakal

सिंधुदुर्ग: सगळ्यांना पुरुन उरलो, आणि केंद्रापर्यत पोहचलो आतापर्यत थांबलो नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर भाजपचा विजय झाला. ३ पक्ष एकत्र असताना पराभूत झाले, याला अक्कल म्हणतात असा टोला अजित पवारांना (Ajit Pawar)केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election)भाजपला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) निवासस्थानी दाखल झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत असताना महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) सडकून टीका केली.

Summary

सगळ्यांना पुरुन उरलो, आणि केंद्रापर्यत पोहचलो आतापर्यत थांबलो नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर भाजपचा विजय झाला.

पुढे ते म्हणाले, अकलेचा वापर झाला म्हणून जिंकलो. हा भाजपचा (BJP) मोठा विजय आहे. राज्याला भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे. 'लगाम'ची टिम नको. महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री नाही, राज्याची वाटचाल अधोगतीकडे चाललीय.अर्थमंत्री येतात आणि पराभव करून जातात. आता लक्ष महाराष्ट्रात सत्ता आणण्याकडे असं विधान नारायण राणें यांनी केलं. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक ताब्यात मिळावी यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चढाओढ होती. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनवरून बॅंक निवडणूकीला वेगळे वळण लागले होते. मात्र आज भाजपची एकहाती सत्ता आल्याने राणे यांचा काय निकाल लागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा बँकेच्या १९ जागांसाठी काल मतदान तर आज ३१ मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला ११ आणि महाविकास आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. भाजपने जिल्हा बँकेवर एक हाती सत्ता काबीज केली आहे. तर विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष ,यांच्यासह तब्बल दहा संचालकांना पराभव पत्करावा लागला.

Ajit Pawar, Narau=yan Rane
Sindhudurg : बोलेरो गाडीचं कर्ज थकवणाऱ्यांना 101 नोटिसा पाठवणार

काय म्हणाले होते अजित पवार

सहकारात पक्षीय राजकारण येवू देवू नका, तर चांगल्या लोकांच्या हातात जिल्हा बँक देवून मागच्या लोकांनी घालून दिलेला आदर्श कायम ठेवा. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले होते. कोकणी माणूस हा विचार करुन मतदान करतो हा इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती या निवडणूकीत करून चुकीच्या लोकांना बँकेपासून बाजूला ठेवा असेही आवाहन त्यांनी शरद कृषी भवन येथे आयोजित जिल्हा बँक निवडणूक पाश्वभूमीवर महाविकास आघाडी मेळाव्यात बोलताना केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com