Natural Disaster Impact on Agriculture 2025-26
esakal
गेल्या काही वर्षांत हवामानाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी मोठं संकट ठरतो आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी अवकाळी पाऊस, यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे. राज्यसभेत केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २०२५-२६ या वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल १०३.२८ लाख हेक्टर शेतीक्षेत्र बाधित झालं आहे. विशेष म्हणजे, हा आकडा मागील दोन वर्षांच्या तुलनेत आठपट अधिक आहे.