
Jayant Patil On Shinde Fadanvis Government : बंडखोरीनंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस यांनी एकत्र येत राज्यात सत्ता स्थापने केली. अनेकांनी हे सरकार संविधानिक नसल्याची टीका केली आहे. या सर्व आरोपप्रत्यारोपांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सध्याच्या सरकारबाबत काही भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या या भविष्यवाणीमुळे राज्यातील शिंदे-भाजपचं सरकार किती काळ टिकणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नसून, भाजपचं उदिष्ट साध्य झाले की, ते सरकार पाडतील आणि त्यानंतर शिंदे यांना चूक झाल्याचं कळेल. मुख्यमंत्री शिंदे भाषण लिहून दिल्यावरच बोललात, वाचून दाखवतात ते भाषण गुलामगिरीमध्ये असल्याचा आरोपदेखील पाटील यांनी केला आहे. शिंदे जसे काम करताय त्यावर निश्चितपणे फडणवीस नाराज आहेत आणि त्यांनी सावधसुद्धा राहावे असा सल्ला पाटील यांनी फडणवीसांना दिला आहे.
निवडणुका एकत्र लढणार का?
दरम्यान, येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस, शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबतही पाटील यांनी विधान केले आहे. ते म्हणाले की, स्थानिक नेत्यांना इतर पक्षातील स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्याशी काही जुळले तरच काही विचार होऊ शकतो, असे सूचक विधान पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.