भाजप सरकारने ओबीसींचे आरक्षण संपविले : आव्हाड (व्हिडिओ)

Jitendra Awhad
Jitendra Awhad

मुंबई : भाजप सरकार हे आरक्षण विरोधी सरकार असून या सरकारने पद्धतशीरपणे ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा डाव रचला असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

1990 साली मंडल आयोगाने शिफारस केलेले आरक्षण शरद पवार यांनी लागू केले. यामुळे इथल्या ओबीसी जातीमधील अनेक लोकं निवडणुकीत जिंकून आले.नगरसेवक, महापौर झाले. मात्र, भाजप सरकारने हे आरक्षण कमी करून ओबीसींवर अन्याय केला आहे. याची सुरुवात 1990 साली लालकृष्ण अडवाणी यांनी मंडल आयोगाच्या विरोधात रथयात्रा काढून केली होती.

रथयात्रेच्या माध्यमातून देशात द्वेषाचं राजकारण पेटवलं गेले. ओबीसी, मागासवर्गीयांनी आता जागे होऊन या सरकारला विरोध करा अन्यथा आपले आरक्षण संपून जाईल, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com