

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
sakal
सोलापूर : येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खतांचा संरक्षित साठा शंभर टक्के राखणे बंधनकारक असून, त्यात कोणतीही कमतरता आढळल्यास संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिला. तसेच खत व बियाणे विक्रीत ‘लिंकिंग’ आढळल्यासही कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.