अंतिम वर्षाच्या परिक्षांवरुन नवे 'वादळ', पुन्हा राज्य विरुद्ध राज्यपाल ?

अंतिम वर्षाच्या परिक्षांवरुन नवे 'वादळ', पुन्हा राज्य विरुद्ध राज्यपाल ?

मुंबई : निसर्ग वादळाचा मुंबईसह महाराष्ट्राला तडाखा बसणार असतानाच अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरुन नवे वादळ संपूर्ण राज्यात घोंघावण्यास सुरुवात झाली. अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर 48 तासाच्या आत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी त्या निर्णयास स्थगित दिली आहे. 

भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलार यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना परिक्षा रद्द करण्याचा निर्णय चूकीचा असल्याचे सांगितले असल्याची चर्चा सुरु झाली. अखेरच्या सत्राची परिक्षा न घेता त्यापूर्वीच्या सत्राच्या परिक्षेतील गुणांची टक्केवारी काढून त्यानुसार गुण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याचवेळी ज्या विद्यार्थ्यांना आपले गुण वाढवायचे असतील त्यांना परिक्षा देण्याचीही मुभा दिली होती. मात्र त्यास भारतीय जनता पक्षाने विरोध केला होता. आता संध्याकाळी राज्यपाल कोश्यारी यांनी ट्वीट करुन परिक्षा रद्द करण्याचा निर्णय स्थगित केला असल्याचे कळवले. 

राज्यपाल हे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलपती आहेत. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय आपल्याशी चर्चा करुन घ्यायला हवा होता, महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार हे आवश्यक आहे, असे ट्वीट त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी याबाबतचा निर्णय विद्यापीठ कायद्यानुसार होईल असे सांगितले.

news issues over conducting final year exams in maharashtra read full news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com