मुंबई : राज्यात आज ही दिवसभरात 8,968 रुग्णांची नोंद झाली. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 4,50,196 झाली आहे. तर आज दिवसभरात 10,221 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आज 266 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 15,842 वर पोहोचला आहे. राज्यात आज रोजी एकूण 1,47,018 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आज 10,221 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत 2,87,030 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.76 % एवढे झाले आहे.आज राज्यात एकूण 266 मृत्यूंची नोंद झाली. त्यापैकी ठाणे परिमंडळ 83, पुणे मंडळ 66,नाशिक 19, औरंगाबाद मंडळ 4,कोल्हापूर 20, लातूर मंडळ 14,अकोला मंडळ 7 ,नागपूर 50 व बाहेच्या राज्यातील 3 मृत्यूचा समावेश आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.52 % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 22,98,723 नमुन्यांपैकी 4,50,196 ( 19.58 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,40,486 लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 37,009 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
---------------------------------------
संपादन - तुषार सोनवणे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.