
मुंबई : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतर्गत ओबीसी मंत्रालयाने राज्यभरातील विविध मतदारसंघामध्ये ७६ कोटी रुपयांच्या ६७४ कामांना मंजुरी दिली. मात्र मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कोणत्याही आमदारांची शिफारस न घेता परस्पर निधी वाटप केला आहे. यावर आठ ते दहा आमदारांनी संताप व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांकडे या निधीच्या स्थगितीसाठी पत्रे दिल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार काही प्रमाणात निधीला मुख्यमंत्र्यांनी स्थगितीही दिली आहे.