राज्यातील धरणांत केवळ 10 टक्के पाणीसाठा ! पुणे विभागात गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्के पाणी कमी

राज्यातील धरणांमध्ये केवळ 10 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे
Dam
DamGoogle

माळीनगर (सोलापूर) : राज्यातील धरणातील (Dams in State) उपयुक्त पाणीसाठा आजअखेर 40.4 टक्‍क्‍यांवर आला आहे. गतवर्षी राज्यात आजअखेर 41.09 टक्के पाणीसाठा होता. यंदा त्यापेक्षा 0.69 टक्‍क्‍यांनी पाणीसाठ्यात घट झाली आहे. पुणे विभागातील धरणांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा आठ टक्के पाणीसाठा कमी आहे. (Only ten percent water remains in the dams in the state)

अमरावती (Amravati), औरंगाबाद (Aurangabad), कोकण (Konkan), नागपूर (Nagpur), नाशिक (Nashik), पुणे (Pune) असे जलसंपदाचे सहा विभाग आहेत. त्यामध्ये 141 मोठे, 258 मध्यम व दोन हजार 868 लघू असे एकूण तीन हजार 267 प्रकल्प आहेत. या प्रकल्पात 10 मेअखेर 24 हजार 407 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. त्यापैकी 16 हजार 474 द.ल.घ.मी. उपयुक्त पाणीसाठा आहे. पुणे विभागात यंदा 32.18 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी या काळात तो 40.18 टक्के होता. जलसंपदा विभागाने आज अखेरचा गोषवारा अहवाल जाहीर केला आहे.

Dam
महापालिका प्रशासन भारावले ! कारण, "त्या' शिक्षकाने मागितली पुन्हा कोरोना ड्यूटी

राज्यातील 141 मोठ्या प्रकल्पात सध्या 40.18 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी तो 44.07 टक्के होता. यावर्षी त्यामध्ये चार टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. राज्यातील मध्यम प्रकल्पात 51.54 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी तो 42.2 टक्के होता. लघू प्रकल्पात यंदा 31.97 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी तो 26.62 टक्के होता. पुणे विभागातील 35 मोठ्या प्रकल्पात सध्या 30.34 टक्के पाणीसाठा असून गतवर्षी 40.79 टक्के इतका होता.

Dam
पाकिस्तानबरोबरच्या दोन युद्धात सहभागी 89 वर्षीय योद्‌ध्याने जिंकली आता कोरोनाविरुद्धचीही लढाई !

अमरावती जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक तृतीयांश तर वाण धरणात दहा टक्‍क्‍यांनी पाणीसाठा कमी आहे. ऊर्ध्व वर्धा धरणात 9 टक्के अधिक पाणीसाठा आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत एक तृतीयांश तर पेन टाकळी धरणात एक चतुर्थांश पाणीसाठा कमी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा धरणात निम्म्याहून कमी पाणीसाठा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणात गतवर्षीच्या तुलनेत 11 टक्‍क्‍यांनी पाणीसाठा कमी आहे.

बीड जिल्ह्यातील मांजरा धरणात 35 टक्के तर माजलगाव धरणात 32 टक्के पाणी आहे. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण कोरडे पडले आहे. नांदेड जिल्ह्यातील निम्न मनारमध्ये 37.76, उस्मानाबाद जिल्ह्यातील निम्न तेरणामध्ये 53.17, परभणी जिल्ह्यातील निम्न दुधनामध्ये 63.54, पालघर जिल्ह्यातील धामणीमध्ये 40.35, कवडसा बंधाऱ्यात 76.54 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिल्लारीमध्ये 52.71 टक्के पाणीसाठा आहे. नाशिक जिल्ह्यातील कडवा, वाकी, भावली, गंगापूर, तिसगाव धरणात समाधानकारक पाणीसाठा आहे.

उजनी धरण तीन टक्‍क्‍यांवर

पुणे जिल्ह्यातील चासकमान, घोड चिंचणी, पिंपळगाव जोगे, नीरा देवधर, भाटघर, पानशेत, वरसगाव धरणात गतवर्षीपेक्षा चांगला पाणीसाठा आहे. सातारा जिल्ह्यातील तारळी, वीर धरणातील पाण्याची स्थिती चांगली आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजले जाणारे उजनी धरण तीन टक्‍क्‍यांवर आले आहे. गतवर्षी त्यामध्ये 11 टक्के उपयुक्त पाणी होते.

10 मे अखेरचा विभागनिहाय उपयुक्त पाणीसाठा (द.ल.घ.मी. मध्ये)

विभाग, उपयुक्त पाणीसाठा व कंसात टक्केवारी

  • अमरावती : 1959.05 (48.08)

  • औरंगाबाद : 3195.96 (43.35)

  • कोकण : 1741.72 (49.6)

  • नागपूर : 2055.99 (44.63)

  • नाशिक : 2627.44 (43.76)

  • पुणे : 4894.63 (32.18)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com