Anil Parab : राज्यघटनेला धक्का लावाल तर सत्ता गमवाल; विरोधकांचा इशारा

‘देशात राज्यघटना हाच सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. हा देश राज्यघटनेने चालेल. घटनेला धक्का लावाल तर सत्ता गमावून बसाल,’
Anil Parab
Anil Parabsakal
Updated on

मुंबई - ‘देशात राज्यघटना हाच सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. हा देश राज्यघटनेने चालेल. घटनेला धक्का लावाल तर सत्ता गमावून बसाल,’ असा इशारा विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी विधानसभेत मंगळवारी ‘भारताच्या राज्यघटनेची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल’ या विषयावरील चर्चेत दिला. विरोधकांना राज्यघटनेचा खोटा पुळका असल्याचे प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आले.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘आपल्या राज्यघटनेचा पायाच संतांच्या शिकवणूकीतून आला आहे. त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता, आणि सामाजिक विषमता यांना विरोध केला. घटनेच्या कलम १९ मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य यांना मान्यता देण्यात आली आहे.’

राजकारण आणि धर्म वेगळा राहावा, यावर बाबासाहेबांनी भर दिला होता. राज्यघटनेने सरकार आणि सरकारी यंत्रणांनी सर्वधर्मीयांशी समान वागण्याचे सांगितले आहे. पण एक मंत्री एका धर्माविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करतो, ही घटनेची पायमल्ली नाही का, असा सवाल त्यांनी केला. धर्मनिरपेक्ष राज्य निर्मिती ही राज्यघटनेची मूळ संकल्पना पायदळी तुडवण्याचे काम सरकार करत असल्याची टीका वड्डेटीवार यांनी केली.

हिंदू धर्म वाचविण्यासाठी आम्ही समर्थ - परब

‘हिंदू धर्म वाचविण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. पण ते करत असताना दुसऱ्याच्‍या धर्मावर आम्ही जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही, तशी आमची शिकवण आहे,’ असे सांगत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. राज्यघटनेवरील चर्चेमध्ये सहभागी होत परब यांनी सरकारकडून घटनेचे उल्लंघन होत असल्याचे नेमके बोट ठेवत सरकारवर टीका केली.

‘विरोधी पक्षनेता नियुक्त करा’

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव म्हणाले, ‘राज्यघटनेवर चर्चा आपण करतोय. उद्या अधिवेशनाच्या शेवटचा दिवस आहे. विधानसभा उपाध्यक्षपदाची निवड आपण करत आहात. विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी संख्येची गरज नाही, याचे सर्व पुरावे मी दिले आहेत. मात्र पत्र देऊनही तुम्ही विरोधी पक्षनेत्याची निवड करत नाही.’

जर माझ्या नावाला तुमचा विरोध असेल तर मी माझे पत्र परत घेतो. दुसऱ्या नावाचे पत्र पक्षप्रमुखांना द्यायला सांगतो. पण विरोधी पक्षनेता नियुक्त करून लोकशाहीचा सन्मान राखा, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

धर्मात भांडणे लावण्याचा अधिकार नाही

कोणाच्या व्यक्त होण्याने, बोलण्यामुळे या समाजाचे आरोग्य दूषित होईल, जाती जातीत धर्मात भांडणे लागतील, हा अधिकार राज्यघटनेने आपल्याला दिलेला नाही, असे सांगत शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी सरकारचेच यावेळी कान टोचले.

घटनेचा सन्मान सरकार ठेवते का?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, की आज राज्यघटनेमुळेच आम्ही या सभागृहात आहे. जोपर्यंत आम्ही या सभागृहात आहे, तोपर्यंत घटनेला धक्का लागू देणार नाही. आज राज्यघटनेवर जर चर्चा असली तरी, या घटनेचा सरकार किती सन्मान ठेवते, हे आपण २०१४ पासून पाहत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com