CM Eknath Shinde : लोकसभेनंतर विरोधक होणार बेरोजगार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील मॉडेला मिल कंपाऊंड येथे 'नमो महारोजगार मेळावा' आयोजन करण्यात आले होते.
Eknath Shinde
Eknath Shindeesakal

ठाणे - आधीच्या सरकारच्या काळात शासकीय नोकऱ्यांवर असलेल्या बंदी आमचे सरकार येताच हटविली. राज्यात डबल इंजिनचे सरकार वेगाने काम करत असल्यामुळे पायाखालची वाळू सरकली असून त्यांचे कोणतेच मुद्दे नसल्याने आरोप करीत आहे. पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येणार असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ठाण्यात आयोजित नमो रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते, त्यावेळी त्यंनी हि टीका केली.

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील मॉडेला मिल कंपाऊंड येथे 'नमो महारोजगार मेळावा' आयोजन करण्यात आले होते. यावेळी कौशल्य रोजगार विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक आदी उपस्थित होते.

आमचे सरकार हे घरात बसून काम करणारे सरकार नसून लोकांच्या दारात जाऊन काम देणारे असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा उध्दव ठाकरे यांचा समाचार घेतला. दोवोसला पहिल्यांदा गेलो त्यानंतर केलेल्या करारांची आता ८० टक्के अमंलबजावणी झाली आहे.

तर आतासुध्दा दोओसला महत्वाचे करार करण्यात आले असून त्या माध्यमातून देखील लाखो रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र अनेक विभागात पुढे असल्याचे सांगत त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे, परंतु त्यांच्यासाठी आपला दवाखाना आहे, अशी टिकाही त्यांनी केली. सरकारच्या वतीने रोजगार दिला जायोत, तर या नमो रोजगाराच्या माध्यमातून तरुणांमध्ये उत्साह नसून महाउत्सवाचे वातावरण असल्याचेही ते म्हणाले.

ठाण्यातून लवकरच मेट्रो सुरु होणार असल्याने त्याचा फायदा देखील होणार आहे. समृध्दी हायवेमुळे रोजगार वाढीसाठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत ज्या पध्दतीने स्कील डेव्लपमेंट सुरु करण्यात आले आहे, त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरु करावे अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान यावेळी त्यांच्या हस्ते कोपरीतील स्वामी विवेकानंद कौशल्य विकास प्रबोधनीचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. तसेच महापालिकेच्या माध्यमातून घरगंटी आणि शिलाई मशिनच्या ११ हजार लाभार्थ्यांपैकी प्राथनिधीक स्वरुपात शिलाई मशिनचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

स्टार्टअपच्या माध्यमातून हातांना काम देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून केले जात आहे. आम्ही राम मंदिर बांधले, परंतु त्याचे राजकारण केले नसल्याचे सांगत मुखी राम आणि प्रत्येकाला काम अशा पध्दतीने आमचे सरकार काम करीत असल्याचेही ते म्हणाले. मुंहमें मे राम बगल मे छुरी असे काम आम्ही करीत नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com