
मुंबई : राज्य सरकारच्या २०२३ आणि २०२४ या दोन वर्षांच्या काळात एक रुपया पीक विमा योजनेत जवळपास ७ लाख १५ हजार ९११ बोगस अर्जदार सापडले आहेत. त्यामुळे या बोगस अर्जदारांपोटी विमा कंपनीला द्यावा लागणारा जवळपास ८०० कोटी इतका निधी वाचला असला तरी यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी राज्य सरकार कठोर उपाययोजना आखण्याच्या तयारीत आहे.