

Padu Machine
ESakal
राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गुरुवारी १५ जानेवारीला महाराष्ट्रात सर्वत्र मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या एका नव्या निर्णयावर टीका केली आहे. ईव्हीएमला नव्यानं कोणतं मशीन लावलं जाणार आहे? तसेच नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. लोकसभा, विधानसभेला प्रचाराचा जुना नियम बाहेर का काढला नाही? असाही प्रश्न त्यांनी केला.