लातूर - ‘आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो. त्यांच्या मनाची चोरी करतो. म्हणून लोक आम्हाला भरभरून मतदान करतात. पण, उद्धव ठाकरे यांनी तर जनादेशाची चोरी केली होती. ते जनादेशचोर आहेत. म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवले. .लोकशाहीमध्ये कसे वागायचे, हे जनादेशचोरांनी आम्हाला शिकवू नये. ते स्वत: जानदेशचोर आणि त्यांचे चेले कफनचोर आहेत. कोरोना काळात त्यांच्या सहकाऱ्यांनी कफन चोरले. त्यातही पैसा कमावला. म्हणून उद्धव ठाकरे यांना कफनचोरांचे सरदार म्हणायचे का,’ असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली..शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जनआक्रोश आंदोलने सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्री चोरांचे सरदार आहेत’, अशी टीका केली. या टीकेला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. हा जनआक्रोश नव्हे तर त्यांचा मनआक्रोश आहे, अशा शब्दांत आंदोलनाची खिल्लीही उडवली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.