Prakash Ambedkar : ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार नाहीत याची गॅरंटी काय? आंबेडकर स्पष्टच बोलले, पाहा Exclusive Interview

Prakash Ambedkar Exclusive Interview : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या आक्रमक आणि रोखठोक वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात.
Prakash Ambedkar Exclusive Interview
Prakash Ambedkar Exclusive Interview

Prakash Ambedkar Exclusive Interview: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या आक्रमक आणि रोखठोक वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असेच खळबळजनक वक्तव्य केले आहे. सकाळचे समुह संपादक सम्राट फडणीस यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान आंबेडकर बोलत होते.

महाविकास आघाडीतील कोणता पक्ष तुमच्यासाठी बोलायला कोणता पक्ष सोयीचा होता? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना आंबेडकर म्हणाले की, खरं सांगायचं झालं तर कोणीच नाही. कारण की आमच्या लक्षात आलं की, उद्धव ठाकरेंचा पक्ष देखील घराणेशाहीला बळी पडला आहे. हे स्वतंत्र्यपणे वागतील असं आम्हाला वाटत होतं, पण तसं झालं नाही. ते राष्ट्रवादीचा भाग बनले आणि काँग्रेसवाले त्याला प्रोत्साहन देत होते.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, जयंत पाटील यांनी फोन केला की, या वयात तुम्ही शरद पवारांना त्रास देऊ नये, तुम्ही पाठिंबा देऊ शकता का असं त्यांनी विचारलं. आम्ही देऊ शकतो असं सांगितलं. त्यानंतर आम्ही पाठिंबा देऊन मोकळे झालो.

Prakash Ambedkar Exclusive Interview
Loksabha: राखीव मतदारसंघांतही रंगताहेत चुरशीच्या लढती! उमेदवार, वक्तव्यांमुळे मतदारसंघ चर्चेत; अमरावती, सोलापूरकडे लक्ष

यावर तुम्ही सगळीकडं पाठिंबा देताय असं नाही, विशिष्ट ठिकाणीच पाठिंबा देताय असं का? असा प्रश्न आंबेडकरांना विचारण्यात आला. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, त्याचं कारण असं की ते तिथं नाहीचयेत. उद्धव ठाकरे यांचा गट स्वतंत्र राहिल आणि भाजपसोबत जाणार नाही याची काहीच गॅरंटी नाही, असं आंबेडकर म्हणाले.

याचं कारण देताना पुढे आंबेडकर म्हणाले की, २०१४ मध्ये राष्ट्रवादीने न मागता पाठिंबा दिली आणि शिवसेनेचा इतिहास आहे की ते भाजपचा भाग राहिले आहेत. ही राजकीय समज आता मोडली आहे. आता तुम्ही नवीन मतदार तयार करताय. म्हणून प्रत्येक पक्षात माध्यम कसं असावं ते त्यांनी ठरवावं, पण ज्यांची मते आपण मागत आहोत त्यांना आपण हे सांगू की, तुम्ही आम्हाला पाच वर्षांसाठी निवडूण देत आहात, या पाच वर्षापर्यंत आम्ही ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्यासोबत समझोता करणार नाही. लहून कोण देणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

Prakash Ambedkar Exclusive Interview
Mahadev Jankar Interview: 'मी लँडलॉर्ड, आता...'; बाहेरचा म्हणून हिणवणाऱ्या विरोधकांना जानकरांचे जोरदार प्रत्युत्तर

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना अकोल्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अकोल्यातून महायुतीने अनुप धोत्रेंना उमेदवारी दिली. आहे. महाविकास आघाडीने मराठा कार्ड खेळत अभय पाटलांना संधी दिली. तर वंचितकडून स्वत: प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना या मुलाखतीमध्ये हात घातला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com