नागरिकत्व कायद्याबाबत दबाव वाढला - पटोले

Nana-Patole
Nana-Patole
Updated on

मुंबई - केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या सुघारीत नागरीकत्व कायद्याची अंमलबजावणी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांनी नाकारली असून हाच निर्णय राज्य सरकारने घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढत आहे. या कायद्याचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीच म्हटल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील ही मागणी पुढे रेटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी किंवा सुधारित नागरिकत्व सारखा कायदा जनतेसाठी घातक असेल तर कायद्याचा पुनर्विचार करा, असे विधान विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी खासगी वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात केली आहे. विधानसभा अध्यक्षांनीच थेट केंद्राच्या कायद्याला विरोध दर्शवल्याने, नागरिकत्व कायद्याबाबत राज्याची भूमिका कायद्याच्या विरोधात जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. नाना पटोले म्हणाले, सरकार कोणाचेही असले तरी जनतेसाठी कायदा करायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com