पावसाचा एक लाख शेतकऱ्यांना फटका! १,५६,०५५ एकरावरील पिकांचे नुकसान; पंचनामे सुरू नाहीत, गतवर्षी एप्रिल-मे महिन्यात झाले होते १.१८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

सोलापूर, नाशिक, नगर, अमरावती, बुलडाणा, जालना व चंद्रपूर या सहा जिल्ह्यांमधील ६० हजार हेक्टरवरील पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. मार्च, एप्रिल आणि मे अशा तीन महिन्यात शेतकऱ्यांचे मॉन्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे नुकसान होऊनही अद्याप पंचनामे झालेले नाहीत.
पिकांचे नुकसान
पिकांचे नुकसानsakal
Updated on

तीन महिन्यातील नुकसान

मार्च-एप्रिलमधील नुकसान

१३,१९४ हेक्टर

मे महिन्यातील नुकसान

४९,२२८ हेक्टर

नुकसानीचे एकूण क्षेत्र

६२,४२२ हेक्टरसोलापूर : राज्यातील मॉन्सूनपूर्व पावसामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यात राज्यातील प्रमुख सात जिल्ह्यांमधील एक लाख ५६ हजार ५५ एकरावरील (६२ हजार ४२२ हेक्टर) पिके भुईसपाट झाली आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार ७०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने मागवून घेतला असून शेतकऱ्यांना आता महसूल विभागाच्या पंचनाम्यानंतर भरपाई मिळणार आहे. पण, अजूनही महसूल विभागाकडून सर्व जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com