Rajmata Jijabai Birth Anniversary: छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं स्वराज्य (Swarajya) ही केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा काळ होता. स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि त्यांच्या मावळ्यांनी आपलं आयुष्य वेचलं, परंतु त्यांच्या मनात स्वराज्याचे संस्कार केले ते राजमाता जिजाऊंनी. त्यांच्या प्रेरणेतूनच मराठा साम्राज्यांची, हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.
राजमाता जिजाऊंचं (Jijabai) आयुष्य नेहमीचं धामधुमीत गेलं. स्वराज्यनिर्मितीच्या काळात कित्येकदा त्यांच्यावर अतिशय कठीण निर्णय घेण्याची वेळ आली. अनेकदा तर शिवबा किंवा स्वराज्य यापैकी एकाची निवड करण्याची वेळ त्यांच्यावरती आली होती. परंतु त्यांनी स्वराज्यासाठी आईचं काळीज नेहमीचं बाजूला ठेवलं आणि रयतेच्या कल्याणासाठी आपल्या पुत्राला लढण्यास प्रवृत्त केले. आज आपण राजमाता जिजाऊंच्या आयुष्यातील असेच काही प्रसंग पाहणार आहोत, ज्या प्रसंगातून त्यांनी स्वराज्यासाठी काय सोसलं याची आपणाला जाणीव होईल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.