

sharad pawar, Eknath Shinde, parth pawar
esakal
Rajya Sabha election Maharashtra : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सात जागांची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सात जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचे स्पष्ट झाले. राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज (ता. ६) होईल. अर्ज माघारीची मुदत नऊ मार्चला संपल्यानंतर सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली जाईल. विधानसभेतील कमी संख्याबळामुळे प्रथमच काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) या दोन पक्षांचा एकही उमेदवार राज्यसभा निवडणुकीत उमेदवार देता आलेला नाही.