अलिबाग : अनेक प्रयत्नानंतरही रायगड जिल्ह्यातील रेशनकार्ड घारकांचे ई-केवायसी १०० टक्के होऊ शकलेले नाही. अनेक नागरिक नोकरी-व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी राहत असल्याने त्यांचे ई-केवायसी पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा नागरिकांसाठी पुरवठा विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. गणेशोत्सवादरम्यान ई-केवायसी न केल्यास शिधापत्रिकेवरील धान्याचा लाभ बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची असणार असा निर्वाणीचा इशाराही दिला आहे.