मुंबई : विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून वसूल केलेला दंड परत करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. तसेच याचिकाकर्त्यानं राज्य सरकारवर त्यांनी ५ कोटींच्या नुकसान भरपाईचा दावाही दाखल केला आहे. (Return fines on people traveling without masks Petition in Mumbai High Court)
सूत्रांच्या माहितीनुसार, फिरोज मिठबोरवाला यांनी यासंदर्भातील याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, सरकारनं केलेली लससक्ती रद्द करण्यात यावी. तसेच विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून वसूल करण्यात आलेला दंडही परत करण्यात यावा. या दंडापोटी राज्य शासनानं ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाईही द्यावी, असं या याचिकेत म्हटलं आहे.
दरम्यान, जनतेवर केलेल्या या दंडात्मक कारवाईबद्दल मुख्यमंत्र्यांसह संबंधित सरकारी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जावी, अशी मागणीही याचिकाकर्ते फिरोज मिठबोरवाला यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.