
मुघल शासक औरंगजेबाची कबर हटवण्याच्या काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते सुरेश 'भैयाजी' जोशी यांनी एक वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की, हा मुद्दा अनावश्यकपणे उपस्थित केला जात आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमात ते माध्यमांशी बोलत होते.