मुंबई - सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर हेमंत नगराळे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. यामुळे नाराज झालेल्या परमबीर सिंग यांनी त्यांच्याकडे सोपवलेला पदभार न स्वीकारता रजेवर गेले आहेत. दरम्यान, आता त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत. याबाबत परमबीर सिंग यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे. यामध्ये सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितलं होतं असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. यावरून आता पुन्हा एकदा विरोधकांकडून गृहमंत्र्यांवर टीका केली जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, हे पत्र फक्त खळबळजनक नाही तर धक्कादायक असं आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याच अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांबाबत असं पत्र लिहिण्याची पहिलीच वेळ आहे. या परिस्थितीत गृहमंत्री त्यांच्या पदावर राहू शकत नाहीत. आता त्यांनी राजीनामा द्यायला हवा.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून लावताना असं म्हटलं की, स्वत:ला वाचवण्यासाठी परमबीर सिंग यांची धडपड सुरु आहे. परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला असल्याचं देशमुख यांनी सांगितलं आहे.
काय म्हणाले फडणवीस -
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.