मुंबईः आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह तीन अधिकाऱ्यांच्या घरी सीबीआयने आज छापेमारी केली आहे. आर्यन खान प्रकरणात खंडणी मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. त्याच प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप झाले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मिळून शाहरुख खानच्या जवळच्या लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी वानखेडेंसह तिघां गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाचं म्हणजे एनसीबीनेच या प्रकरणी सीबीआयकडे तक्रार दिली होती. त्यानुसार समीर वानखेडे यांची प्राथमिक चौकशीदेखील झाली. तीन आयआरएस अधिकाऱ्यांनी आर्यन खान विरोधाच चार्ज लावले जावू नये यासाठी २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
आता या प्रकरणी आज सीबीआयने कानपूर, रांची आणि दिल्लीत छापेमारी केली. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे.
2021चे क्रुझ प्रकरण
समीर वानखेडे यांनी आर्यन खानला दोन वर्षांपूर्वी कथित क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी समीर वानखेडे हे मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी होते. वानखेडे हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय प्रमुख होते जेव्हा त्यांनी आणि इतरांनी 2021 मध्ये एका क्रूझ जहाजावर छापा टाकला होता. या प्रकरणी आर्यन खानने चार आठवडे तुरुंगात काढले. तथापि, "पुरेशा पुराव्याअभावी" मे 2022 मध्ये अँटी-ड्रग्स एजन्सीने त्याला सर्व आरोपांपासून मुक्त केले.
एनसीबीचा तपास आणि आरोप
एनसीबीने केला तपास समीर वानखेडेविरुद्ध आर्यन खान प्रकरणात एनसीबीने दक्षता तपास केला होता, ज्याचा अहवाल गृह मंत्रालयालाही सादर करण्यात आला होता. या अहवालात समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.यासोबतच वानखेडेवर शाहरुख खानच्या कुटुंबीयांकडून 25 कोटी रुपयांची मागणी करून त्यातून 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.