संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा
Updated on

संगमनेरः संगमनेर शहराच्या लगत अभंगमळा व वकील कॉलनी परिसरातील स.न. ७८, ७९, ८० या जागांवरील नगरपालिकेचे आरक्षण अखेर रद्द करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल ४० वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आमदार अमोल खताळ पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीचा हातभार लाभला असून अखेर तोडगा निघाला आहे.

या आरक्षणामुळे स्थानिक नागरिकांना दीर्घकाळ विकासकामांपासून वंचित राहावे लागत होते. कर मात्र तिप्पट दराने वसूल होत असल्याने नागरिक नाराज होते. परंतु अखेर शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे या भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com