काल (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभरावा मन की बात कार्यक्रम केला. यासाठी भाजपने देशभरात या कार्यक्रम आयोजन केले होते. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. पंतप्रधानांच्या कालचा कार्यक्रम टाळ्या वाजवण्याता इव्हेंट होता, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाल, मन की बात काय आहे? जन की बात ऐकावी. कोरोना काळात जसं थाळ्या वाजवण्याचा इव्हेंट केला. तसा कालचा टाळ्या वाजवण्याचा इव्हेंट होता. प्रधानंमंत्र्यांचे भाषण प्रेरणादायी असायला हवे, मात्र काल देशभरात लोकांना भाषण ऐकण्यासाठी एकत्र करण्यात आले. ज्यांनी ऐकायचं चे ऐकतील. त्यासाठी अट्टहास कशाला.
अभिनेत्यांपासून इतर सगळ लोक घेऊन जो इव्हेंट केला. त्याची देशाला गरज होती का?. याची भाजपला गरज होती. म्हणून त्यांनी तो कार्यक्रम केला. हा त्यांच्या प्रश्न आहे, असे राऊत म्हणाले.
अजित पवार आणि जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले होते. यावर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार आहे, असे राऊत म्हणाले. कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी अशाप्रकारचे वक्तव्य करण्यात येत आहेत, असेही राऊत म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.