'सावरकर विरुद्ध गांधी' असे राजकारण सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. 'मी सावरकर नाही, मी गांधी आहे' या राहुल गांधींच्या वक्तव्यावर शिंदे-फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर 'महाविकास आघाडी'तील प्रमुख घटक पक्षाचे उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका झाली.
राहुल यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर झालेल्या कारवाईबाबत काँग्रेस लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, तर दुसरीकडे भाजपने सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल यांना घेरण्यास सुरुवात केली आहे.
भाजप आणि संघ परिवराचा काहीही सबंध नव्हता. संघ परिवाराने सावरकरांना काय शत्रू मानले होते तसेच त्यांना वाळीत टाकले होते. मुख्यमंत्री वीर सावरकरांवर काही बोलू शकत नाहीत. ते एका कागदावर लिहून दिलेले वाचून दाखवतात. सत्ताधारी अडानी बचाव यात्रा काढत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. या ढोंग्यांनी आम्हाला सावरकर सांगायचा प्रयत्न करू नये, असे देखील राऊत म्हणाले.
आमचं शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नसून आम्हाला सावरकरांचे विज्ञानवादी हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. आम्हाला भाजपने सावरकर सांगू नये. सावरकरांची गोमातेवरची भूमिका भाजपला मान्य आहे का?, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे यांना बाहेर पडण्याची गरज आहे, असल्याचे भाजप नेते म्हणतात. यावर संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना महाविकास आघाडी असल्यामुळे शंभर टक्के सत्तापरिवर्तन होणार आहे. महाविकास आघाडीत सर्वांनी सावरकरांची भूमिका मान्य केली आहे. काँग्रेसने सावरकरांचे पुस्तके वाचावी, असे राऊत म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.