पीडितांना न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा असते. दोन्ही बाजू ऐकण्यासाठी न्यायाधीश असतात. खटल्याच्य सुनावणीनंतर न्यायाधीश कोण दोषी आणि पीडित कोण याचा निर्णय देतात, पण जेव्हा न्यायाधीशच कथिथपणे लाच घेताना पकडले जातात तेव्हा न्यायाची आशा धुळीस मिळते. साता-यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.