

Government School Development
ESakal
मुंबई : महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी, सरकारी शाळांचा दर्जा उंचावून आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन, या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशसंख्येत वाढ करण्यावर विशेष भर दिला आहे. मंत्रालयात आयोजित एका आढावा बैठकीदरम्यान त्यांनी सांगितले की, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद शाळांच्या आदर्श कामगिरीचा वस्तुपाठ समोर ठेवून, सर्वच सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न अधिक तीव्र केले पाहिजेत.