Ashadhi Wari 2023: वारकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराची घटना क्लेशदायक, सरकारचा निषेध! अजित पवार भडकले

Ashadhi Wari 2023: वारकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराची घटना क्लेशदायक, सरकारचा निषेध! अजित पवार भडकले
Updated on

Ashadhi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान झाले आहे. या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळते. मात्र या पालखीला सोहळ्याला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. वारकरी आणि पोलीस आमने-सामने आले. यावेळी लाठीचार्ज झाल्याचा देखील आरोप आहे. तसे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलीस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.

महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढी वारीची गौरवशाली परंपरा आहे. आषाढी वारी आणि आळंदीहून निघणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे आपल्या महाराष्ट्राच्या अध्यात्म, भक्ती परंपरेचं वैभव आहे. दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीत येतात. वारी आणि प्रस्थान सोहळ्याचं योग्य नियोजनही केलं जातं. वारकरीही या नियोजनाला सहकार्य करत असतात. परंतु यंदा कुठेतरी चूक घडलेली दिसत आहे. प्रशासनाच्या गैर व्यवस्थापनामुळे हे घडल्याचं दिसत आहे. ही संपूर्ण घटना दु:खदायक, तशीच मनाला चीड आणणारी आहे. अशी घटना यापुढे घडू नये, यासाठी पूर्ण काळजी घेण्यात यावी, असे अजित पवार म्हणाले.

कुठल्याही आध्यात्मिक कार्यात आणि पंढरपूर वारी सारख्या सोहळ्यात सहभागी होताना, सर्वांनी राजकीय हेतू बाजूला ठेवावा. ईश्वरभक्ती आणि वारकऱ्यांची सेवा हाच हेतू मनात ठेवून वारीत सहभागी व्हावं, असं आवाहन देखील अजित पवार यांनी केल आहे.

Ashadhi Wari 2023: वारकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराची घटना क्लेशदायक, सरकारचा निषेध! अजित पवार भडकले
Ashadhi Wari 2023: वारीमुळे पारधी समाजातील 150 जणांना डांबून ठेवले, अ‍ॅड. सरोदेंचा आरोपाने खळबळ

आळंदीत लाठीमार झालेला नाही, तर...

पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला होता, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली.

तसे नियोजन सुद्धा करण्यात आले. मानाच्या दिंडी प्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आल्या. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते.

बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा, त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, ही माझी नम्र विनंती असं, पोलीस आयुक्तांनी सांगितलं.

Ashadhi Wari 2023: वारकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराची घटना क्लेशदायक, सरकारचा निषेध! अजित पवार भडकले
Pune : शिवराज्याभिषेक दिनाची अनोखी मानवंदना, सिंहगडावर '३५० वेळा सिंहगड चढणे' उपक्रमात ४३० जणांच्या सहभागाची नोंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com