आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात शिवसेना गुंग : आंबेडकर

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात शिवसेना गुंग : आंबेडकर

मुंबई : राज्याच्या अनेक भागांत पूरस्थिती असताना आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री कसे होणार, हे सांगण्यात शिवसेना गुंतली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी 'साम' वाहिनीशी बोलताना केली. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी ऍड. आंबेडकर यांच्या भेटीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आणि विजय वड्डेटीवार गेले होते. त्या वेळी ते 'साम'शी बोलत होते. 

ऍड. आंबेडकर म्हणाले, मी पुराच्या परिस्थितीवर तीन दिवस लक्ष ठेवून आहे. आम्हीही पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु तातडीने उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने कुठेही यात गांभीर्याने लक्ष दिले नाही. अख्खा शिवसेना पक्ष आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री कसे होणार, हे सांगण्यात गुंतला आहे. पूरस्थितीत सात ते आठ दिवस लोक पाण्यात आहेत. पाण्याच्या फुगवटा वाढल्याने पूरस्थिती निर्माण झाली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने चुकीचे जीआर काढले, ते बदलायला हवेत. जेणेकरून लोकांना मदत मिळू शकेल, असे ऍड. आंबेडकर म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढविली होती. त्यामुळे कॉंग्रेस आघाडीच्या दहा जागा धोक्‍यात आल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून समोर आले होते. या वेळी वंचित आघाडी भाजपची बी-टीम असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला होता. यावर विधानसभा निवडणुकीसाठी आमच्यासोबत आघाडी करायची असेल तर बी-टीम संदर्भात केलेल्या आरोपाचा खुलासा कॉंग्रेसने करावा, असे आवाहन ऍड. आंबेडकर यांनी केले होते.

आता माणिकराव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार भेटीला गेल्यानंतरही ऍड. आंबेडकर यांनी त्यांच्या भूमिकेची आठवण कॉंग्रेसला करून दिली. यावर दोन दिवसांत खुलासा करण्याचे आश्‍वासन कॉंग्रेस नेत्यांनी दिल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com