

सन १६७८ मध्ये शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहिम पूर्ण करून पन्हाळगड गाठला. विजापूरच्या सर्जाखानाने महाराजांच्या ठाण्यांवर हल्ले केले, तर प्रतिउत्तरादाखल महाराजांच्या सैन्याने लक्ष्मेश्वर, गदगसारख्या विजापूरकरांच्या ठिकाणी आक्रमण करून मोठ्या लुटी केल्या. काही दिवसांतच जमशीरखान, सलीमखान आणि सर्जाखान यांनी महाराजांवर चाल करून येण्याचा प्रयत्न केला, परंतु पावसाळ्यानंतर झालेल्या लढाईत महाराजांनी मोठा विजय मिळवला.